मुळ ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही ! उमरखेड येथे ओबीसीचा एल्गार मोर्चा सकल ओबीसी धडकले एस डी ओ कार्यालयावर



मुळ ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत आज दि 17 रोजी उमरखेड येथे सकल ओबीसी समाजाचा एल्गार मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे धडकला असून  यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.  हैद्राबाद व सातारा गॅझेटीयनच्या आधारे शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे मुळे ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आले असून, आरक्षणातील जागांवर सामाजिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि संपन्न समाजाचा समावेश झाल्यास मुळ ओबीसींना मोठा फटका बसेल. मुळ ओबीसींना 27% राजकीय आणि 19% शैक्षणिक व इतर क्षेत्रातील आरक्षण मिळाले आहे. हे आरक्षण त्यांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय मागासलेपणामुळे देण्यात आले असून त्यात कुठल्याही नव्या जाती अथवा प्रवर्गांचा समावेश होऊ नये, अशी ठाम मागणी करत शेकडो ओबीसी बांधव उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकले . महाराष्ट्रात तात्काळ जातीनिहाय जनगणना करून ओबीसींची खरी संख्या निश्चित करून त्याचा डेटा जाहीर करण्यात यावा.तामिळनाडूच्या धर्तीवर आरक्षणाची मर्यादा 75% पर्यंत वाढवून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाची अंमलबजावणी करावी.ओबीसींना लोकसभा व विधानसभा मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे.

मंडल आयोगाची काटेकोर अंमलबजावणी करून ओबीसींना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय न्याय द्यावा.अर्थसंकल्पात ओबीसींसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात तरतूद करून ती वेळेवर खर्च करावी. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती, मोफत शैक्षणिक साहित्य आणि तालुका स्तरावर उच्च प्रतीची शासकीय वसतिगृहे उभारण्यात यावीत. ओबीसी कर्मचाऱ्यांना वेळेवर पदोन्नती मिळावी.2024-25 मध्ये निर्गमीत नव्या जात प्रमाणपत्रांची सेवा निवृत्त न्यायाधीशांच्या समितीमार्फत चौकशी करून खोटी प्रमाणपत्रे रद्द करावीत व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.मुळ ओबीसींच्या आंदोलनादरम्यान आत्महत्या केलेल्या किंवा अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत व एक शासकीय नोकरी देऊन पुनर्वसन करावे.या सर्व मागण्या तातडीने मान्य करून अन्याय होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री यांनी हस्तक्षेप करावा, अशी मुळ ओबीसी समाजाची एकमुखी मागणी आहे.  या निवेदनामुळे ओबीसी समाजातील असंतोष स्पष्ट झाला असून, शासनाने तात्काळ सकारात्मक भूमिका घेतली नाही तर आगामी काळात संघर्ष उभारण्याचा इशारा  देण्यात आला यावेळी उमरखेड तालुक्यातील शेकडोच्या संकेत सकल  ओबीसी महिला व बांधव उपस्थित होते .



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या