सोयाबीन, कापुस, संत्रा, मौसंबी पिकाचे पंचनामे योग्य प्रकारे करावे आणि काेणताही शेतकरी लाभापासून वंचित राहु नये



तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकर्यांचे नुकसान झालेले आहेत

उपसंपादक गोपाल गौरवाड 

वर्धा/आष्टी -: मा.गुढे साहेब (वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख), मा. शाहगड़कर साहेब (जिल्हा प्रमुख) यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्का कृषि अधिकारी मा. नाडगेरी साहेब यांना शिव सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
   आज दि. ५/९/२०२० ला  मा. गुढे साहेब (वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख), मा. शाहगड़कर साहेब (जिल्हा प्रमुख) यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषि अधिकारी मा. नाडगेरी साहेब यांना शिव सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. कि आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकर्यांचे नुकसान झालेले आहेत. त्यात सोयाबीन, कापुस, संत्रा, मौसंबी इत्यादि त्यांचे पंचनामे योग्य प्रकारे करावे आणि काेनताही शेतकरी लाभापासून वंचित राहु नये.ज्यांचे नुकसान झाले ते व ही माहिती शासना परेंत पोहचावी आणि शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी याकरीता निवेदन देण्यात् आले 
निवेदन देतानी मा. चंद्रशेखर नेहारे शिव सेना तालुक्का प्रमुख, मा. सुरेश भाऊ टरके शा
खा प्रमुख, शरद  वरकड युवा सेना सर्कल प्रमुख, अनिलभाउ देशमुख शहर प्रमुख, प्रफुल मुंदाने युवा सेना उप सर्कल प्रमुख, छगन ढोरे इत्यादि शिव सैनिक उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या